नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हरियानात पंचकुला इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंची सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई सुरूच आहे. आज पाचव्या दिवशी राज्याच्या खेळाडूंनी पाच सुवर्ण, सहा रौप्य आणि दोन कांस्य पदकांची कमाई केली आहे. त्यात बॅडमिंटन, कुस्ती, अॅथलेटिक्स, कब्बडी, सायकलिंग आदी क्रीडाप्रकारांचा समावेश आहे.बॅडमिंटनमध्ये दर्शन पुजारीनं त्याचा पारंपरिक प्रतिस्पर्धी तामीळनाडूच्या ऋत्विक संजीवला दोन सेटमध्ये हरवले. कब्बडीत मुलांच्या संघाला सुवर्णपदकानं थोडक्यात हुलकावणी दिली. त्यांचा हरियाणाकडून १९ गुणांनी पराभव झाला.

मुलांच्या संघाला कांस्यपदक मिळालं.ट्रॅक सायकलिंगमध्ये केरीन प्रकारात मंगेश ताकमोगेनं आणि मुलींमध्ये पूजा दानोळेनं याच प्रकारात रौप्य पदकं पटकावली.अॅथलेटिक्समध्ये उंच उडीत – अनिकेत मानेनं सुवर्ण पदक पटकावले. तर आर्यन पाटीलने याच प्रकारात रौप्य जिंकले.साताऱ्याच्या सुदेष्णा शिवणकरने १०० मीटर धावण्यात सुवर्ण कमाई केली. मुलींमध्ये याच प्रकारात वडगाव शेच्या अवंतिका नरळेने रौप्य पदकावर नाव कोरले.महाराष्ट्राच्या पैलवानांनी हरियानातल्या खेलो इंडियाचा आखाडा गाजवला. कुस्तीत ५१ किलो फ्री स्टाईल – नरसिंग पाटीलला सुवर्ण तर रोहित पाटीलला रौप्य पदक मिळालं. मुलींमध्ये ४९ किलो गटात अहिल्या शिंदेनं कांस्य पदक जिंकलं. ६५ किलो फ्रीस्टाईलमध्ये कोल्हापूरच्याच शुभम पाटीलनं सुवर्ण पदक मिळवलं.

७१ किलो गटात कोल्हापूरच्या संकेत पाटीलनं कांस्यची कमाई केली. कबड्डीत महाराष्ट्रातल्या मुलींच्या संघाला हरयाणाकडून पराभव पत्कारावा लागल्यानं ते दुसऱ्या स्थानावर राहिल्या. (४८-२९) अशा १९ गुणांच्या फरकानं महाराष्ट्रासंघाचा पराभव झाला.तर, मुलांच्या संघाला कांस्य पदक मिळालं.एकूण १५ सुवर्ण, १५ रौप्य आणि १४ कांस्य पदकासह महाराष्ट्र पदक तालिकेत दुसऱ्या स्थानी कायम आहे. तर १७ सुवर्ण, १५ रौप्य आणि २२ कांस्य पदक पटकावून हरियाणानं पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. ११ सुवर्ण पदकांसह मणिपूर तिसऱ्या स्थानी आहे.पदकतालिकेत हरयाणा २२ सुर्वण, १६ रौप्य आणि २६ कांस्य पदकांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. तर १९ सुर्वण, २१ रौप्य आणि १५ कांस्य पदकांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर असून तिसऱ्या स्थानावर मणीपूर, चौथ्या स्थानी पंजाब, पाचव्या स्थानावर तामीळनाडू आहे.