नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंडमध्ये देवघर इथ नव्यान बांधलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. सोळा हजार आठशे कोटी रूपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणीही त्यांनी केली. या प्रकल्पांमुळे झारखंडच्या विकासाला गती मिळेल असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. राज्यांच्या विकासामुळेच देशाचा विकास होत असतो. त्यामुळे राज्याच्या विकासात केंद्र कायम सोबत आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. पर्यटन मंत्रालयाच्या प्रसार योजने अंतर्गत जिर्णोद्धार केलेल्या,बाबा बैद्यनाथ धाम मंदिर परिसराचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांनी केल.