मुंबई (वृत्तसंस्था) : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे. जिल्ह्यातील खेड तालुक्यातील धुवोली ते शिरगाव दरम्यान काल दरड कोसळल्यामुळे वाडा ते भोरगिरी भीमाशंकर हा रस्ता बंद झाला आहे. दरड हटवण्याचं काम काल रात्री पर्यंत सुरू होतं. पोखरी घाटामध्येही दरड कोसळली होती; ती हटवण्यात आली आहे. आंबेगाव तालुक्यातील जवळे इथं घराची भिंत अंगावर पडून महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान पुणे शहरात पाऊस आणि रस्त्यांवरील खड्डयांमुळं प्रमुख रस्त्यांवर सातत्यानं वाहतूक कोंडी होत असल्याचं चित्र आहे.