मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारभारावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांना टीका केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. मंत्रालयात हजारो फाईली तुंबल्या आहेत, हिवाळी अधिवेशनापर्यंत उर्वरित मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता नाही. पालकमंत्री नेमलेले नाहीत. राज्यावर अतिवृष्टी आणि आता ढगफुटीचे संकट आलं. धरणाचं पाणी सोडल्यामुळे त्याखालच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे याकडे लक्ष द्यायला कुणी नाही, असे सांगत, मुख्य़मंत्री सभा आणि देवदर्शनात मग्न असल्याबद्द्ल त्यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे असंही ते म्हणाले.