नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या प्रत्येक नागरिकांपर्यंत सुविधा पोहचवण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे लाभ जनतेपर्यंत खात्रीलायकरित्या पक्ष कार्यकत्र नी पोहचवावेत, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते वाराणसी या त्यांच्या संसदीय मतदारसंघातील पक्ष कार्यकत्यांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बोलत होते.

काशी इथे हाती घेतलेल्या विविध विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीत पक्ष कार्यकर्ते देत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. स्वच्छता मोहिम हा केवळ प्रकल्प नव्हे तर, तो राहणीमानातला बदल होऊन ती सवय झाली पाहिजे, असं एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी यावेळी देशातल्या जनतेला दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या.