मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडनवीसच पुन्हा विराजमान होतील, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते.

केवळ दहा जागा वाढलेल्या पक्षाचं प्रसारमाध्यमं भरभरुन कौतुक करत आहेत. मात्र, अपक्षांच्या साथीनंच साधारण गेल्यावेळ इतक्या जागा राखणाऱ्या भाजपावर नकारात्मक सूर लावला जात आहे, याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं.