नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमा सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांचं आणि त्यांच्या नातेवाईकांचं अभिनंदन केलं.

आपल्या ट्विटवर संदेशात मोदी म्हणाले की, सीमा सुरक्षा दलाच्या जवानांमुळे आपली सीमा सुरक्षित आहे. राष्ट्रीय आपत्तीच्यावेळी देखील या जवानांनी आपली कर्मठ वृत्ती दाखवून नागरिकांना मदतीचा हात दिला आहे, असंही ते या संदेशात म्हणाले.