मुंबई (वृत्तसंस्था) : प्रहार जनशक्ती पक्षानं शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. पक्षाचे आमदार बच्चू कडू, आणि राजकुमार पटेल यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र त्यांना दिलं.

शेतातील पेरणी ते कापणी पर्यंतची कामं रोहयोमधून करणं,  मेळघाट मतदारसंघातल्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक, दिव्यांग आणि आदिवासींसाठीच्या योजनांची अंमलबजावणी अशा मुद्यांवर त्यांनी  शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.

प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेसोबत राहील असं बच्ची कडू यांनी म्हटलं आहे. बच्चू कडू अचलपूरमधून तर राजकुमार पटेल मेळघाटातून निवडून आले आहेत.