मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार जुलै महिन्यात होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज औरंगाबादमध्ये वार्ताहरांशी बोलताना केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ते काल रात्री दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्याविषयी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.  (राज्याशी निगडीत विविध मुद्यांवर हा दौरा होता अशी माहिती फडणवीस यांनी दिली. मंत्रीमंडळ विस्ताराची नेमकी तारीख आणि अधिक माहिती सांगायला त्यांनी नकार दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर अंतिम निर्णय घेतील, असं ते म्हणाले. आठवडाभरात हा विस्तार होईल असा दावा शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी केला.