मुंबई : राज्यातल्या आपत्तीग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या तातडीच्या अनुदानाची रक्कम दुप्पट म्हणजेच प्रति कुटुंब १० हजार रुपये करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून, दुकानदारांना ५० हजार रुपयांपर्यंत, तर टपरीधारकांना १० हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत केली. ही वाढीव मदत यंदाच्या जून ते ऑक्टोबर दरम्यानच्या नैसर्गिक आपत्तीतल्या बाधितांना दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं.