????????????????????????????????????

पुणे : राम जन्मभूमी– बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्य न्यायालयाच्या निकालाच्या अनुशंगाने कायदा व सुव्यवस्था आणि शांतता राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक घेण्यात आली.

येत्या काही दिवसात राम जन्मभूमी– बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल येण्याची शक्यता आहेया निकालाचा सर्वांनी आदर ठेवून शांतता राखावीअसे आवाहन जिल्हाधिकारी राम व पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केलेतसेच नागरिकांनी सोशल मिडीयासंदर्भात दक्ष रहावे असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटीलपिंपरी चिंचवडचे सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळनिवासी उपजिल्हाधिकारी डॉजयश्री कटारे आदींसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारीसामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.