नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयानं काल अयोध्या प्रकरणावर निकाल दिल्यानंतर उत्तर प्रदेशात कोणतीही अनुचित घटना घडल्याचं वृत्त नाही. शांततापूर्ण वातावरण कायम रहावं, यासाठी पोलीस दल सज्ज आहे.

अयोध्येचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आशुतोष पांडे यांनी आकाशवाणीला सांगितलं, की सर्व समुदायांना विश्वासात घेऊन, पोलिसांनी चर्चा केली आहे. मिश्र लोकसंख्येच्या भागात आणि संवेदनशील ठिकाणी पोलिसांचं लक्ष आहे.