नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचं आम्ही आदर करतो, मात्र या निकालानं आमचं समाधान झालेलं नाही, अशी प्रतिक्रिया ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डानं दिली आहे.

या निकालाचा अभ्यास केल्यानंतर पुनर्विचार याचिका दाखल करायची किंवा नाही याबाबतचा निर्णय बोर्ड घेईल. असं बोर्डाचे सचिव जाफरयाब जिलानी यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. सर्व नागरिकांनी शांतता राखावी असं आवाहनही त्यांनी केलं.