नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून सर्वच उमेदवार नागरिकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. श्रीलंका पीपल्स पार्टीचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार गोताबाया राजपक्षे यांनी म्हटलं आहे. पराभव होण्यापूर्वी निराश झालेले गट निराधार आरोप करत असून लोकांनी यापासून दूर रहावे, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

प्रचार सभेत राजपक्षे म्हणाले की ते जनतेला धोरण, सुरक्षा आणि अर्थव्यवस्था याबाबत साक्षर करत आहेत, तर काही लोक पाच वर्षे सत्तेत असताना काहीच साध्य न करताही चिखलफेक करत आहेत. आपले दुहेरी नागरिकत्व रद्द करत असल्याच पुनरुच्चार त्यांनी केला.