मुंबई (वृत्तसंस्था) : सध्या राज्यात राजकीय अस्थिरता असली तरीही मध्यावधी निवडणुका होणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत ते बोलत होते.

नजीकच्या काळात आमदारांना निवडणुकीला सामोरं जावं लागणार नाही, त्यामुळे त्यांनी चिंता करु नये, असं पवार यांनी सांगितलं.  या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना अजित पवार यांनी, आघाडीतला एकही आमदार फुटणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.