नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फीट इंडिया चळवळ ही देशातल्या प्रत्येक नागरिकाची चळवळ होणं गरजचं आहे, असं युवक कल्याण आणि खेळ मंत्री रिजीजू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या युवक कल्याण आणि खेळ मंत्र्यांच्या तसंच सचिवांच्या परिषदेत बोलत होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना फीट इंडिया अभियानाचा अंगीकार करण्याचे निर्देश दिले आहेत, असं रिजीजू म्हणाले. फीट इंडिया ही एक जीवनशैली असून या जीवनशैलीला सर्व राज्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचं ते म्हणाले.