मुंबई (वृत्तसंस्था) : सत्ता स्थापनेबाबत भाजपाकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं स्पष्ट करत पुढची पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री महाराष्ट्रात असेल, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं.

आज सकाळी घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांनी पाच वर्षांसाठी शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदाला संमती दिली आहे. भाजपासोबत वाटाघाटी करण्याची वेळ टळून गेली आहे. भाजपानं आता कोणतंही पद दिलं तरी नको असं राऊत यांनी स्पष्ट केलं.