मुंबई (वृत्तसंस्था) : काँग्रेसची अजूनही शिवसेना युतीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा नाही, काँग्रेसने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, असं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोला इथं वार्ताहर परिषदेत व्यक्त केलं.

राष्ट्रवादी पक्ष बिनबुडाचा आहे आणि तो कोणत्याही बाजूनं जाऊ शकतो, असा आरोपही त्यांनी केला. काळजीवाहू मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी 10 हजार कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांसाठी जाहीर केली होती.

या घोषणेची राज्यपाल अंमलबजावणी करणार का आणि केंद्रसरकार याबाबत राज्यपालाना निर्देश देईल का असा सवालही त्यांनी केला.