नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशानं गेल्या पाच वर्षात प्रगती साधली असून एका क्रांतीकारी प्रवासाचे आपण साक्षीदार आहोत, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ते नवी दिल्लीत एका खाजगी वाहिनीने आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलत होते.

गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेले अनेक प्रश्नही या काळात सुटले असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांनी त्यांच्यासाठी अथक काम करणाऱ्या आपल्या सरकारला त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी बहूमत दिलं आहे, असंही ते म्हणाले.