मुंबई (वृत्तसंस्था) : मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपुन-छपून बहुमत कसं सिद्ध करता येईल, यावर चर्चा करण्यात नव्या सरकारनं धन्यता मानली अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी केली आहे.
मग बहुमताचे दावे कशासाठी? या सरकारकडे बहुमत असेल तर लपून-छपून सभागृह बोलावण्याचा निर्णय का? नियमबाह्य पद्धतीनं हंगामी अध्यक्ष बदलण्याचा प्रयत्न कशासाठी? स्वतःच्या आमदारांवर अजूनही इतका अविश्वास का? असे प्रश्न त्यांनी आज लिहिलेल्या फेसबूक पोष्टमधे उपस्थित केले आहेत.