नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फेक न्यूजला आळा घालण्यासाठी केंद्रसरकारच्या पत्रसूचना कार्यालयानं एक बातमी पडताळणी कक्ष स्थापन केला आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं जनतेला आवाहन केलं आहे की, समाजमाध्यमांसह इतर कुठेही एखाद्या बातमीबद्दल संशय आला तर, ती या कक्षाकडे पाठवावी.