मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ४ हजार ३५५ कोटींच्या पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळाप्रकरणी बँकेच्या तीन अधिकाऱ्यांना अटक केली आहे.

या तिघांना आधी चौकशीसाठी बोलवलं होतं, पण त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं त्यांना आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे.