नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या  महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभर त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. संसद भवन परिसरात असलेल्या डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयानं एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईत चैत्यभूमी इथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय लोटला आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी इथे आलेल्या अनुयायांसाठी प्रशासनानं चोख व्यवस्था केली आहे.