नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळमध्ये सुरु असलेल्या १३ व्या दक्षिण आशियाई स्पर्धांमध्ये भारतानं आत्तापर्यंत १२४ पदकं पटकावली आहेत. भारताने काल ५४ पदकं पटकावली. यात २८ सुवर्ण, १९ रौप्य, आणि ७ कास्य पदकांचा समावेश आहे.

भारत्तोलन, जलतरण, नेमबाजी, तायक्वान्डो या क्रीडा प्रकारात भरतानं आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. पदतालिकेत भारत पहिल्या स्थानावर आहे.