नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वच्छता पंधरवड्यानिमित्त संरक्षण मंत्रालय देशभरातील 400 हून अधिक ठिकाणी व्यापक स्वच्छता कार्यक्रम आयोजित करणार आहे. प्लॉस्टिक कचरा हटवणं तसंच आसपासच्या भागात स्वच्छता राखण्याकरता जनतेमध्ये जागरुकता निर्माण करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आज नवी दिल्ली इथं मुख्य कार्यक्रमाचं उद्धाटन करतील. या कार्यक्रमात पथनाट्य, चर्चासत्र, प्रश्नमंजूषा, चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. या माध्यमातून पर्यावरणावर होणार्‍या प्लॉस्टिकच्या दुष्परिणामासंबंधी जागरुकता निर्माण करण्यात येणार आहे.