मुंबई (वृत्तसंस्था) : पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या अडचणींबाबत येत्या एक दोन दिवसात रिझर्व बँकेशी चर्चा करण्याचं आश्वासन मंत्री जयंत पाटील यांनी दिलं आहे. पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेचं राज्य सहकारी बँकेत विलिनीकरण करण्याचा पर्याय यापूर्वी पाटील यांनी सुचवला होता.

त्यासंदर्भात आपण रिझर्व बँकेशी बोलू, असं ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एकोणऐंशीव्या वाढदिवसानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमाच्या वेळी ते बातमीदारांशी बोलत होते.