मुंबई (वृत्तसंस्था) : एका महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार करू न शकणारं राज्य सरकार शेतकऱ्यांना काय मदत करणार, असा प्रश्र्न उपस्थित करत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सरकारवर टीका केली आहे. ते सिंधुदूर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते.