नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत जनतेला योग्य महिती मिळावी तसंच विरोधी पक्ष पसरवत असलेली खोटी माहिती उघड व्हावी या उद्देशानं भाजपानं जनसंपर्क कार्यक्रम घोषित केला आहे. भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

येत्या दहा दिवसात पक्ष 3 कोटींहून अधिक कुटुंबियांशी संपर्क साधत, नागरिकत्व सुधारणा कायदद्याची माहिती देईल असं पक्षाचे सचिव भूपेंदर यादव यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं. या नवीन कायद्याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी पक्ष प्रत्येक जिल्ह्यात सभा आयोजित करणार असून 250 हून अधिक पत्रकार परिषदा घेणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.