मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार येत्या ३० तारखेला होणार आहे. हा शपथविधीचा कार्यक्रम दुपारी दोनच्या आत उरकण्याची कोणतीही तोंडी अथवा लेखी सूचना राज्य सरकारला केलेली नाही असं राजभवनानं  स्पष्ट केलं आहे.

यासंदर्भात राजभवनानं प्रसिद्धिपत्र जारी केलं असून यासंदर्भात प्रसिद्ध झालेलं वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचं  या पत्रकात म्हटलं आहे.