नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तिसर्‍या ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेच्या मशाल दौडीला आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते सुरुवात झाली. या क्रीडा स्पर्धा 10 ते 22 जानेवारी या कालावधीत गुवाहाटी इथं होणार आहेत. या स्पर्धांमधे भाग घेणार्‍या खेळाडूंसाठी उत्साहवर्धक वातावरण तयार करण्याचं आवाहन सोनोवाल यांनी आसामच्या जनतेला केलं.

क्रीडा स्पर्धांसाठी राज्यात एकूण आठ ठिकाणं निश्चित केली असून, हा देशातला आतापर्यंत सर्वात मोठा क्रीडा महोत्सव ठरावा यासाठी स्पर्धेच्या आयोजनाशी संबंधित अधिकार्‍यांची जोरदार तयारी सुरु आहे.