नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्ताननं नेहमीच धार्मिक अल्पसंख्यांकाना त्रास दिला असून, अल्पसंख्याकाना मदत करणं ही आपली जबाबदारी असं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

ते कर्नाटकमधल्या तुमकुरु इथं बोलत होते. पाकिस्तानची निर्मिती धार्मिक मुद्यांवरुन झाली असून, तिथे धार्मिक अल्पसंख्याकांना नेहमीच त्रास दिला जातो, असंही ते म्हणाले.

नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात होत असलेली आंदोलनं चुकीची असून पाकिस्तान करत असलेल्या अत्याचाराविरोधात आंदोलन झाली पाहिजे असं ते म्हणाले.