नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमधील मुझफ्फरपूर इथं अनाथालयात कुणाही मुलीचा मृत्यू झालेला नाही, असं केंद्रीय गुप्तचर विभागातर्फे सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आलं. अशा त-हेच्या अपमृत्यूचा कोणताही पुरावा नसल्याचं अँटर्नी जनरल के के वेणूगोपाल यांनी न्यायालयात सांगितलं.

अनाथालयातल्या सर्वच्या सर्व १७ प्रकरणांचा तपास सीबीआयनं पूर्ण केला असल्याचं त्यांनी सांगितलं.