नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेविरुद्ध टी-२० क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत पुणे इथं झालेल्या तिस-या आणि शेवटच्या सामन्यात भारतानं श्रीलंकेचा ७८ धावांनी दारुण पराभव केला आणि मालिका २-० अशी जिंकली.

भारताचा शार्दुल ठाकूर याला सामनावीर तर नवदीप सैनीला मालिकवीर म्हणून गौरवण्यात आलं. पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.