नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायदा हा नागरिकत्व बहाल करण्यासाठी आहे, कुणाचं नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही, असं ठाम प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं.

कोलकाता इथं रामकृष्ण मिशनच्या बेलूर मठात स्वामी विवेकानंद यांना आदरांजली वाहिल्यानंतर जनसभेला संबोधित करताना ते म्हणाले. राजकीय स्वार्थामुळे याविषयी लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.