नवी दिल्ली : राष्ट्रीय एकात्मिक भ्रमंतीवर असलेल्या रामबाण, रिसी आणि राजोरी प्रांतातील 20 आणि बारामुल्लामधल्या 120 विद्यार्थ्यांनी आज नवी दिल्लीला भेट दिली. या विद्यार्थ्यांच्या गटाने लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्याशी संवाद साधला. यावेळी रावत यांनी या भागात सेवा बजावत असताना आलेले अनुभव सांगितले आणि राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेत सक्रीय योगदान देण्यासाठी कठोर परिश्रम करण्याचे आवाहन केले तसेच त्यांनी या विद्यार्थ्यांना सशस्त्र दलात सहभागी होऊन देशाची सेवा करण्याचे आवाहन केले.