मुंबई : अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाला स्थगिती द्यावी, यासाठी शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिका तपासून पाहू असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. यासंदर्भात न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या पीठासमोर काल सुनावणी झाली.

यावेळी न्यायालयानं या याचिकांसंदर्भात केंद्र सरकार, गुजरात राज्य सरकार तसंच नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनला नोटीसही पाठवली आहे. येत्या २०, शेतकऱ्यांच्या सर्व याचिका तपासू असं न्यायालयानं म्हटलं आहे.