नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या तारखेला “परीक्षा पे चर्चा” या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातले विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसोबत संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम नवी दिल्लीतल्या तालकटोरा क्रीडा संकुलात होणार आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये या कार्यक्रमाची उत्सुकता वाढली असून, देशभरातून दोन हजारांहून अधिक विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांसोबत परीक्षांमुळे येणाऱ्या ताणावर कशाप्रकारे नियंत्रण मिळवावं याविषयी संवाद साधतील, तसंच यासंदर्भात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरंही देणार आहेत. गेल्यावर्षीही जानेवारीमध्ये परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.