नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांगले काम, नि:स्वार्थ सेवा आणि प्रामाणिकपणा ही यशाची त्रिसूत्री आहे, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.

चंद परिवार फाऊंडेशन या संस्थेनं ठाणे इथं आर. जे. ठाकूर महाविद्यालयात काल आयोजित केलेल्या पाचव्या वार्षिक समारंभामध्ये राज्यपाल बोलत होते.

संस्थेच्या कामात योगदान दिलेल्या सुरेश राणाजी, बिरेंद्र नेगी आणि डॉक्टर दिनेश चंद यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरवही करण्यात आला. संस्थेचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.