नवी दिल्ली : सत्य आणि न्यायाचा विजय झाला असे सांगून पंतप्रधान
मोदींनी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत केले. कुलभूषण जाधव यांना न्याय मिळेल हा माझा ठाम विश्वास आहे असे सांगून पंतप्रधान म्हणाले की त्यांचे सरकार नेहमी प्रत्येक भारतीयाच्या सुरक्षेसाठी व कल्याणासाठी काम करेल.