मुंबई (वृत्तसंस्था) : बेळगावातल्या सीमाभागातल्या मराठी बांधवांच्या पाठीशी राज्यसरकार ठामपणे उभे असल्याची ग्वाही सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयातल्या सीमावासीयांची लढाई राज्यसरकार संपूर्ण ताकदीने लढेल, या शब्दात त्यांनी सीमा भागातल्या मराठी बांधवांना आश्वस्त केले आहे. त्यांच्याशी आज बेळगावमधल्या मराठी बांधवांनी दूरध्वनीवरुन संवाद साधला.

कर्नाटक पोलिसांची दडपशाही झुगारुन बेळगावात आज शिवसेनेने हुतात्मा दीन पाळला. बेळगाव सीमा लढ्यात बलिदान दिलेल्या ६७ शिवसैनिकांना शहीद दर्जा द्यावा अशी मागणी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली.