मुंबई (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडीचं कामकाज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थित सुरु आहे, असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

आघाडीतल्या घटकपक्षांमधे कोणतीही धुसपूस नाही. समन्वयानं सर्वजण करत अरत आहेत, असं त्यांनी सांगितलं. देवेंद्र फडनवीस फारकाळ विरोधी पक्षनेते किंवा माजी मुख्यमंत्री राहणार नाहीत, असं भाकित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाहक भैयाजी जोशी यांनी केलं आहे.

त्यावर प्रतिक्रिया देताना फडनवीस दिल्लीत जाऊन चांगलं काम करतील, त्यांना आमच्याकडून शुभेच्छा असं पाटील म्हणाले, ते आज कोल्हापूरात बातमीदारांशी बोलत होते.