नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशियाई कुस्ती चषक स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारतानं एक सुवर्ण आणि तीन रौप्य पदकं जिंकली.

नवी दिल्लीत सुरु असणा-या या स्पर्धेच्या कालच्या सामन्यांमधे ५७ किलो वजनी गटात भारताच्या रवी दहियाने सुवर्णपदक जिंकले तर बजरंग पुनिया गौरव बलियान आणि सत्यावर्त कडीयन यांचा त्यांच्या गटांच्या अंतिम फेरीत पराभव झाल्यानं ते रौप्य पदकाचे मानकरी ठरले.