नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या महिलांच्या टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं चित्तथरारक लढतीत न्यूझीलंडचा चार धावांनी पराभव केला आणि स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना शेफाली वर्माच्या तडाखेबाज 46 धावांच्या जोरावर भारतीय संघानं वीस षटकात आठ गडी गमावून  133 धावा केल्या होत्या.

याआधीच्या दोन्ही सामन्यांमधे ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांना पराभूत केल्यानं भारतानं अ गटात सर्वोच्च स्थान प्राप्त केलं असून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.