मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या भरभराटीसाठी टाकलेलं पहिलं पाऊल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच्या अर्थसंकल्पाबाबत दिली.

आगामी काळात राज्य प्रगतीचा आणखी मोठी पल्ला गाठेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा अर्थसंकल्प म्हणजे जाहिर सभेतली भाषण वाटतात यात केवळ मोठ मोठ्या घोषणा आहेत, मात्र त्याला कोणतही पाठबळ नाही, अशी टिका विधानसभेतले विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांनी केली.

सत्ताधारी पक्षाच्या घटक पक्षानी अर्थसंकल्पाचं कौतुक केलं आहे तर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी टिका केली आहे.