नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कसारा घाटात दुरूस्तीचं काम सुरु असल्यामुळे काही लांब पल्ल्यांच्या काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. तर, काही गाड्या रद्द झाल्या आहेत, असं मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागानं कळवलं आहे.

राज्यराणी एक्स्प्रेसच्या नांदेड ते मुंबई आणि मुंबई ते नांदेड, तर नंदीग्राम एक्स्प्रेसच्या नागपूर ते मुंबई आणि मुंबई ते नागपूर  अशा तेरा आणि 14 मार्चच्या दोन फे-या रद्द केल्या आहेत.

तर, १४ मार्चला सिकंदराबाद ते मुंबई देवगिरी एक्स्प्रेस ९० मिनिटे उशिरा धावेल, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागानं दिली आहे.