नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायझर आणि इतर औषधांची विक्री कमाल विक्री किंमत अर्थात, एमआरपी पेक्षा जास्त भावानं होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश राष्ट्रीय औषध मूल्य प्राधिकरणानं आज सर्व राज्य आणि केंद्र सरकारला दिले.

कोरोनाचा सामना करण्यासाठी आवश्यक औषध आणि इतर गोष्टींचा पुरेसा साठा देशात उपलब्ध असल्याची माहिती प्राधिकरणानं ट्विटमधे दिली आहे