नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आतापर्यंत कोरोना विषाणू संक्रमाणावरच्या उपचारानंतर 24 रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. या 24 जणांमधे उत्तर प्रदेशातल्या 9, दिल्लीतल्या 5, केरळ आणि राजस्थानमधल्या प्रत्येकी तीन, कर्नाटक मधल्या दोन, तर तामिळनाडू आणि तेलंगणामधल्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे. या 24 जणांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलं आहे.