नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमरावती जिल्ह्यात धारणी, चिखलदरा तहसील अंतर्गत अंगणवाडीतल्या ३ ते ६ वर्षे वयोगटातल्या ३१ हजार आदिवासी बालकांना घरबसल्या पोषण आहार दिला जात आहे. गेल्या दहा दिवसापासून ही योजना बंद होती. मात्र आजपासून १५ मे पर्यंत पोषण आहार घरपोच मिळणार आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.