नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सांगली जिल्ह्यातल्या २३ तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका कोरोनाबाधित रुग्णावर मिरज इथं शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या सर्वांची प्रकृती सध्या स्थीर आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या थेट संपर्कात आलेले १७ जण विलगीकरण कक्षात  आहेत, तर अप्रत्यक्ष संपर्कात आलेले इस्म्लामपूरमधले १६१ जण त्यांच्या घरी क्वारंटाईन आहेत.

एकाच कुटुंबातल्या २४ जणांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झाल्यानं सांगली जिल्ह्यात संचारबंदीचे नियम अधिक कडक केले जाणार आहेत अशी माहिती  जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी काल दिली.