नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई, ठाणे, शहापूर आणि अन्य परिसरातून अन्य परिसरातून नाशिकसह उत्तर महाराष्ट्राकडे निघालेल्या सुमारे पाच ते सहा हजार नागरिकांना इगतपुरी येथे जिल्ह्याच्या सीमाबंदीमुळे थांबावे लागले आहे.
या स्थलांतरितांना येथे थांबवण्यास स्थानिक नागरिकांनी प्रचंड विरोध सुरू केला आहे.
दरम्यान, रेल्वेने त्यांच्या इगतपुरी यार्डात उभी करण्यासाठी काल रात्री एक गाडी दादरहून सोडली होती. या गाडी काही प्रवासी अनधिकृतरित्या प्रवास करत असल्याचे आढळून आले. त्यांना इगतपुरीत उतरविण्यात आलं आणि रेल्वे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.